Ad Advertisement Ad Advertisement

Wildlife Crime : भारतात बेट बॉम्ब्सचा कहर, वन्यजीवांच्या जीवावर उठले स्फोटक

पिकांचे नुकसान रोखण्यासाठी लपवलेले स्फोटक ठरते वन्यजीवांसाठी मृत्यूचा सापळा

नवी दिल्ली : Wildlife Crime भारतातील जंगलांच्या सीमावर्ती भागांत शेतातील पिकांचे रानडुकरांपासून रक्षण करण्यासाठी आणि शिकारीसाठी वापरले जाणारे बेट बॉम्ब्स (खाद्यपदार्थांत लपवलेले बॉम्ब) वन्यजीवांसाठी अत्यंत प्राणघातक ठरत आहेत. या अमानुष कृत्यामुळे केवळ रानडुकरेच नाही, तर इतर अनेक वन्यजीव आणि पाळीव प्राण्यांनाही अत्यंत वेदनादायक मृत्यूला सामोरे जावे लागत आहे

काय आहेत बेट बॉम्ब्स?

शेतकरी आणि शिकारी वन्यजीवांना आकर्षित करण्यासाठी बटाटा, कोहळा किंवा मांसाच्या तुकड्यांमध्ये देशी स्फोटके लपवून ठेवतात. रानडुक्कर किंवा इतर प्राणी हे अन्न समजून जेव्हा ते तोंडात धरतात आणि चावतात, तेव्हा त्याचा तीव्र स्फोट होतो. या स्फोटामुळे प्राण्यांचा जबडा छिन्नविच्छिन्न होतो आणि जीभ पूर्णपणे निकामी होते. अशा अवस्थेत अन्न आणि पाण्यावाचून तडफडून अनेक दिवस अत्यंत वेदना सहन करत या प्राण्यांचा मृत्यू होतो.

ओडिशामधील मन हेलावून टाकणारी घटना

नुकतीच ओडिसातील चंदका वन्यजीव अभयारण्याच्या जवळ असलेल्या बांकी भागात एक धक्कादायक घटना समोर आली. येथे एका बैलाने चरत असताना तिथे पडलेला कोहळा खाण्याचा प्रयत्न केला. तो रानडुकरांच्या शिकारीसाठी ठेवलेला बेट बॉम्ब होता. तो चावताच झालेल्या स्फोटात बैलाचा संपूर्ण जबडा उडाला आणि काही दिवसांतच त्याचा मृत्यू झाला

मानव-वन्यजीव संघर्षाचे भीषण वास्तव

या समस्येमागे वाढत चाललेला मानव-वन्यजीव संघर्ष कारणीभूत आहे. जंगलाच्या कडेला राहणाऱ्या शेतकऱ्यांच्या पिकांचे रानडुकरांमुळे मोठे नुकसान होते. सरकारी नुकसानभरपाई मिळण्यास होणारा विलंब आणि अपुरी मदत यामुळे हताश होऊन अनेक शेतकरी अशा बेकायदेशीर आणि अमानुष मार्गांचा अवलंब करत आहेत. वन्यजीव कायद्यानुसार अशा कृत्यांवर कडक बंदी असली, तरी दुर्गम भागात या छुप्या शिकारीवर नियंत्रण ठेवणे वनविभागासाठी मोठे आव्हान बनले आहे.

Read About: Marathwada Tiger Corridor Project मराठवाड्यातील व्याघ्र संचार प्रकल्पासाठी हालचाली गतिमान; सहा वाघांची भ्रमंती
E-Paper : Punyanagari E-Paper

Comments
Loading comments...